पाठ स्वच्छतेचा
प्रचीन काळात पुर्वजांनी
सांगितली महती स्वच्छतेची
रोगराईच्या निर्मुलासाठीच
गरज आहे आता ती काळाची
घरादार स्वच्छ ठेवण्यासाठी
भिती मनी दाखवली लक्ष्मीची
परिसराला सुंदर ठेवण्यास
निर्मिती केली बाग बगिचांची
वंर्षान मागुन वर्ष सरत गेली
गर्दी वाढत गेली माणसांची
स्वच्छतेला कमी लेखल्याने
गिळले रोग राईचा राक्षसाने
समाजाला जागृत करणे
गरज आहे आता काळाची
प्रत्येकाचे कर्तव्य आहे
परिसर स्वच्छ ठेवण्याचे
चला करुया सूरवात आपणच
स्वच्छतेच्या चांगल्या कामाची
जगतामंध्ये शान राखूया
उज्वल भारतीय संस्कृतीची
0 comments:
Post a Comment